Maharashtra Havaman:- राज्यातील शेतकरी, नागरिक, मच्छिमार आणि सर्वसामान्यांसाठी हवामान विभागाकडून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मान्सूनने महाराष्ट्रात वेळेआधी आगमन केलं होतं, मात्र त्यानंतर त्याने काहीसा विराम घेतला होता. त्यानंतरही अपेक्षित प्रमाणात पावसाचा जोर राज्यात दिसून आला नाही. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाबाबत मोठी आणि दिलासादायक अपडेट मिळाली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या १२ ते १५ जून या कालावधीत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. यानंतरच राज्यात १५ जूननंतर मान्सून पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरण्या करण्यात अजून घाई न करण्याचा सल्ला दिला आहे.