सरकारकडून शेतकऱ्यांना 5 लाखांचे अनुदान! विहीर खोदण्यासाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या अर्जप्रक्रिया

Well Subsidy : शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची उपलब्धता म्हणजे सर्वात महत्त्वाचा प्रश्न. विशेषतः कोरडवाहू भागांतील शेतकरी दरवर्षी पावसाच्या भरोशावर शेती करतात. अशा परिस्थितीत जर शेतातच पाण्याचा स्रोत म्हणजे विहीर उपलब्ध असेल, तर शेतकरी अधिक सशक्त होतो आणि शेतीला स्थिरता मिळते. हे लक्षात घेता सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी ५ लाख रुपये इतकं अनुदान मिळणार आहे. ही योजना महत्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) राबवली जाते आणि या अंतर्गत दिलं जाणारं अनुदान पूर्वी ४ लाखांपर्यंत मर्यादित होतं, ते आता ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आलं आहे.

या निर्णयामुळे विशेषतः कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता त्यांना आपल्या शेतात विहीर खोदून सिंचनाची सुविधा निर्माण करता येणार असून, यामुळे शेती सिंचनाखाली आणता येईल. ही योजना फक्त त्या गावांमध्ये लागू आहे जिथे मनरेगाच्या माध्यमातून कामं सुरू आहेत. त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यापूर्वी हे निश्चित करावं लागेल की तुमच्या गावात मनरेगाचे काम सुरू आहे की नाही.

ही योजना विविध सामाजिक आणि आर्थिक गटातील शेतकऱ्यांसाठी खुली आहे. यामध्ये अनुसूचित जाती-जमातीचे शेतकरी, भटक्या व विमुक्त जमातीतील कुटुंब, महिला कर्ता असलेली कुटुंबे, दिव्यांग कर्ता असलेली कुटुंब, बीपीएल (BPL) कार्डधारक, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, तसेच सिमांत व अल्पभूधारक शेतकरी (२.५ ते ५ एकरपर्यंत जमीनधारक) यांचा समावेश आहे. म्हणजेच आर्थिकदृष्ट्या मागास आणि गरजू शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *